By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: . तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय,ममताजींची अरेरावी याबाबतीत बिलकुल खपवून घेतली जाणार नाही …
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > आंतरराष्ट्रीय > . तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय,ममताजींची अरेरावी याबाबतीत बिलकुल खपवून घेतली जाणार नाही …
आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय

. तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचा पर्याय,ममताजींची अरेरावी याबाबतीत बिलकुल खपवून घेतली जाणार नाही …

admin
Last updated: 2025/04/17 at 11:50 AM
admin Published April 13, 2025
Share
SHARE

वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क -‘संसदेने हा कायदा संमत केला असला, तरी आम्ही त्याची अंमलबजावणी राज्यात करणार नाही.

 

हा कायदा आम्ही नाही, तर केंद्र सरकारने केला आहे.’ असे स्पष्ट केले आहे !

 

ममता बॅनर्जी यांची ही भूमिका अगदी उघडपणे मुस्लीम तुष्टीकरणाची आहे, एव्हढेच नव्हे, तर ती संविधानविरोधी ही आहे.
संविधानात अनुस्यूत असलेल्या संघराज्य प्रणालीनुसार केंद्र आणि राज्ये यांचे जसे संबंध राज्यघटनेला अभिप्रेत आहेत, त्या
मूळ पायालाच हादरा देणारी ही भूमिका आहे. कसे ते आपण सविस्तर पाहू : संविधानाच्या भाग ११ – संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध , यामध्ये दोन प्रकरणे आहेत. प्रकरण १ – वैधानिक संबंध. प्रकरण २ -प्रशासनिक संबंध. प्रथम आपण वैधानिक संबंध बघू.

 

वैधानिक संबंधांच्या दृष्टीने अनुच्छेद २४५, २४६ आणि अनुच्छेद २५४ हे विशेष महत्वाचे आहेत.
अनुच्छेद २४५ : (१) संविधानाच्या तरतुदींच्या अधीन राहून, संसदेला भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरिता किंवा त्याच्या
कोणत्याही भागाकरिता कायदे करता येतील, आणि राज्याच्या विधानमंडळाला , त्या त्या राज्याकरिता कायदे करता येतील.
अनुच्छेद २४६ : संसदेने आणि राज्याच्या विधानमंडळानी करावयाच्या कायद्यांचे विषय – यामध्ये संविधानाच्या सातव्या
सूचित – तीन सूची (याद्या) देण्यात आलेल्या असून, पहिली सूची संघ सूची – केंद्राने करावयाच्या कायद्यांचे विषय, सूची

 

दोन मध्ये राज्य सूची – राज्याने करावयाच्या कायद्यांचे विषय, आणि सूची तीन मध्ये समवर्ती सूची – अर्थात केंद्र व राज्य
दोन्हींना ज्या विषयी कायदे करता येतील, असे विषय दिलेले आहेत.

यामध्ये समवर्ती सूचीतील क्रमांक २८ मध्ये – ‘धर्मादाय व धर्मादायी संस्था, धर्मादायी व धार्मिक दाननिधी व धार्मिक संस्था’ – हा विषय येतो. अर्थात यामध्ये वक्फ बोर्डांचा विषय येतो, हे स्पष्ट आहे. त्यामुळे, समवर्ती सूचित असलेल्या या विषयासंबंधी संसद कायदा करू शकते, हे स्पष्ट आहे.

 

 

अनुच्छेद २५४:(१) राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या कायद्याची कोणतीही तरतूद जर , संसद जो कायदा कायदा
अधिनियमित करण्यास सक्षम आहे, अशा संसदीय कायद्याच्या कोणत्याही तरतुदीस किंवा समवर्ती सूचित नमूद
केलेल्यांपैकी एखाद्या बाबी संबंधी विद्यमान असलेल्या कोणत्याही कायद्याच्या कोणत्याही तरतुदीस प्रतिकूल असेल, तर
संसदेने केलेला कायदा – मग तो अशा राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या कायद्याच्या अगोदर पारित झालेला असो, किंवा
नंतर झालेला असो, – अधिभावी ठरेल आणि राज्याच्या विधानमंडळाने केलेला कायदा प्रतिकुलतेच्या मर्यादेपुरता शून्यवत
होईल. (ह्यामध्ये हे स्पष्ट होते, की राज्याच्या मुख्यमंत्र्याला संसदेने संमत केलेल्या कायद्याच्या विरोधी भूमिका घेणे , किंवा
राज्यात त्याची अंमलबजावणी न करण्याची भूमिका घेणे हे शक्य नाही. तसे करणे संविधानविरोधी होईल.)
आता प्रकरण दोन मधील ”प्रशासनिक संबंध’ हा भाग बघू.

 

 

अनुच्छेद २५६ : प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल, की त्यायोगे, संसदेने केलेल्या कायद्यांचे
आणि त्या राज्यात जे लागू असतील अशा कोणत्याही विद्यमान कायद्यांचे पालन सुनिश्चित होईल, आणि त्या
प्रयोजनाकरिता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निर्देश राज्याला देणे हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या
व्याप्तीत येईल.

 

अनुच्छेद २५७ : प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल की, त्यायोगे संघराज्याच्या कार्यकारी
अधिकाराच्या वापराला प्रत्यवाय किंवा बाध येणार नाही आणि त्या प्रयोजनाकरिता भारत सरकारला आवश्यक वाटतील
असे निर्देश राज्याला देणे , हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल. (या अनुच्छेदांनुसार योग्य ते निर्देश केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला तातडीने देणे आवश्यक आहे.)

इथे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे, की वरील भाग संविधानातून जसाच्या तसा उद्घृत केलेला आहे. अर्थात ही लेखकाची मते
नसून प्रत्यक्ष संविधान आहे. आता यावरून कोणाच्याही लक्षात येईल, की संसदेने संमत केलेला समवर्ती सूचीतील कायदा
राज्यात लागू न करण्याचा ममता बॅनर्जी यांचा निर्णय ही शुद्ध मनमानी असून, त्या भूमिकेला संविधानाचा कोणताही
आधार नाही. खरेतर ती भूमिका म्हणजे संविधानात अनुस्यूत असलेल्या संघराज्य रचनेला, त्यामागील मूळ संकल्पनेलाच
आव्हान दिल्यासारखे आहे.

 

 

उद्या जर खरोखरीच ममता बॅनर्जींनी आपलीच भूमिका पुढे रेटून वक्फ्ची अंमलबजावणी टाळली, तर त्याचा अर्थ त्या राज्यात शासन संविधानाच्या तरतुदीनुसार चालवणे शक्य नाही, असा होईल. आणि इथे आपल्या संविधानाच्या निर्मात्यांची
दूरदृष्टी दिसून येते, ती अशी, की त्यांनी अशा सगळ्या संभाव्य गोष्टींचा योग्य तो विचार आधीच करून, अशा वेळी
कोणत्या उपाययोजना केंद्र सरकारला करता येतील, याची पुरेशी तरतूद करून ठेवलेली आहे. ती संविधानाच्या भाग १८ :
‘आणीबाणी संबंधी तरतुदी’ मधील अनुच्छेद ३५६ : राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्याबाबत तरतुदी –
यामध्ये सविस्तर दिलेली आहे.

थोडक्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी , आपल्या अहंमन्यतेच्या नादात भारतीय राज्यघटनेच्या विरोधी
भूमिका घेत आहेत. आता अशा परिस्थितीत केंद्राने देशहित आणि संविधानाला अभिप्रेत असलेली संघराज्य व्यवस्था
अबाधित राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना योजाव्यात ते राज्यघटनेत अनुच्छेद ३५६ मध्ये नमूद आहे. केंद्राने आता
कणखर भूमिका घेऊन ममताजींची अरेरावी याबाबतीत बिलकुल खपवून घेतली जाणार नाही हे स्पष्ट करावे. त्यांनी जर
त्यांच्या भूमिकेलाच चिकटून राहण्याचे ठरवले, तर मात्र केंद्राला नाईलाजाने अनुच्छेद ३५६ च्या तरतुदींनुसार तिथे
राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. राष्ट्रहित सर्वप्रथम – या आपल्या ब्रीदाला जागून भाजपच्या, मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार एव्हढा कणखरपणा निश्चितच दाखवील, ही अपेक्षा आहे.

 

 

You Might Also Like

Video : ग्लेशियर फुटून अख्खं गाव बर्फाखाली गाडलं, अनेक घरं उद्ध्वस्त तर काही वाहून गेली

Video : मनोहर धाकडने त्या रात्री हायवेर Se* केल्यानंतर पुढे काय केलं?

भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …

मोठी बातमी ! पाकिस्तानने युद्धविराम तोडला, जम्मूत पुन्हा ब्लॅकआऊट ..

भारताने पाकिस्तानच्या ‘या’ ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या …

TAGGED: Waqf Amendment Bill - वक्फ सुधारणा विधेयक
admin April 17, 2025 April 13, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
शेत-शिवार

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मोसंबी लागवड व संवर्धन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

admin admin February 18, 2025
चालत्या गाडीत पत्नीला दुसऱ्यासोबत पाहिल्यावर पती झोपला बोनेटवर अन …
भयंकर ! कार झाडाला धडकली, कारचे दोन तुकडे , एअरबॅग्ज फाटून तिघांचा जागीच मृत्यू …
लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची पाच लाखांची फसवणूक
पृथ्वी नष्ट होईल, माणसं मरून जातील, तेव्हाही हा एकमेव जीव राहील जिवंत, नाव ऐकून तुम्हीही…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?