देशाचा 76 वा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा होत आहे. 26 जानेवारीला 1950 रोजी संविधान का लागू करण्यात आले. त्या दिवसापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
राजधानी दिल्ली दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
देशात 26 जानेवारीला 1950 पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संविधान लागू झाल्यानंतर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले होते. सध्या राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर हा दिवस साजरा करण्यात येतो. पण पहिला प्रजाकसत्तादिन हा इर्विन स्टेडियम येथे साजरा करण्यात आला होता. सध्या येथे प्राणीसंग्रहालय असून हे मैदान आज मेजर ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जाते.
पहिल्या प्रजाकसत्ताक दिनाचे फोटोवरुन हा दिवस कसा साजरा करण्यात आले हे लक्षात येते. या सोहळ्यास काही घोडे, बग्गी यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली असल्याचे दिसते. साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला या कार्यक्रमात मोठा उत्साह होता.
भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर लवकरच, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सध्याच्या संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती, नंतर इर्विन स्टेडियममध्ये २१ तोफांच्या सलामीसह तिरंगा फडकावला. त्यांनी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले.
1955 पासून प्रजाकसत्ताक दिनाचे कर्तव्य पथ येथे हा आयोजन केले जाते. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी, कर्तव्य पथावर (पूर्वीचे राजपथ) एक परेड आयोजित केली जाते. विविध राज्यांतील चित्ररथाचे संचलन येथून होते. हा कार्यक्रम पाहण्यात खूप गर्दी असते. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची पद्धतही खूप बदलली आहे.
आज साजरा होत असलेल्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे समारंभात प्रमुख पाहुणे आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रबोवो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांचा दीर्घ इतिहास आहे जो अलिकडच्या वर्षांत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत विकसित झाला आहे.