By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: बाबा रामदेव यांची दिनचर्या,आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > स्टर मनी विश्लेषण > बाबा रामदेव यांची दिनचर्या,आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट
स्टर मनी विश्लेषण

बाबा रामदेव यांची दिनचर्या,आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट

admin
Last updated: 2025/01/13 at 11:37 AM
admin Published January 13, 2025
Share
SHARE

निरोगी राहण्यासाठी काय खावे बाबा रामदेवांचा सल्ला (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)

59 वर्षांच्या वयातही स्वामी रामदेव पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि त्यांच्या घनदाट काळ्या केसांवरून त्यांच्या आरोग्याचा अंदाज लावता येतो.

बाबा रामदेव दिवसातून फक्त एकदाच अन्न खातात, ज्यामध्ये 3 भाज्या निश्चित असतात. सात्विक आहार घेतल्यामुळे, त्यांना 50 वर्षांपासून कोणताही आजार झालेला नाही. त्याचे वजन 65 किलो आहे आणि हिमोग्लोबिन 17.5 आहे, रक्तदाब 70/110 आहे आणि साखरेची पातळी 70-75 च्या दरम्यान आहे. त्यांनी त्यांचा संपूर्ण आहार, जेवण आणि दैनंदिन दिनचर्या याबद्दल सर्व माहिती दिली आहे.

 

Curly tales ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, 100 वर्षांच्या वयापर्यंत व्यक्तीला म्हातारे वाटू नये किंवा व्यक्तीने आजारी पडू नये आणि यासाठी सात्विक अन्न खावे आणि योगाभ्यास करावा. प्रत्येकाने रोज दोन योगाभ्यास नियमित करावेत कारण हे शरीराला आतून निरोगी आणि तरुण बनवतात. बालपणात, त्यांना एकदा डास चावल्यामुळे ताप आला आणि त्यानंतर त्यांना कधीही सर्दी, खोकला, अतिसार किंवा अन्नातून विषबाधा झाली नाही असेही त्यांनी सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram)

व्हिडिओ येथे पहा !

 

बाबा रामदेव यांची दिनचर्या

बाबा रामदेव यांनी त्यांच्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगितले. तुम्ही तुमची सकाळ कशी सुरू करता, तुम्ही काय खाता, तुम्ही पहिले काय खाता आणि शेवटी काय खाता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी असे दोन पदार्थ खाऊ नका जे शेकडो आजारांना कारणीभूत ठरू शकतात असा सल्ला दिला.

दिवसाची सुरूवात होते अशी

सकाळी उठून प्यावे कोमट पाणी

रामदेव पहाटे 3 वाजता उठतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे हा त्यांचा नित्यनियम आहे आणि नंतर दैनंदिन कामाला सुरूवात करतात आणि सर्वांनी असेच करावे असंही त्यांनी म्हटलं. यानंतर रामदेव बाबा आंघोळ करून 1 तास ध्यान करतात आणि नंतर धावण्यासाठी जातात आणि त्यानंतर थेट लोकांना योग शिकवण्यास सुरुवात करतात. मुलाखतीत त्यांनी सांगितले की ते दिवसातून फक्त एकदाच जेवतात

 

किती वेळा जेवावे?

दिवसातून एकदाच जेवणे योग्य

दिवसातून किती वेळा जेवावे हा प्रश्न लोकांच्या मनात अनेकदा येतो. जास्त वेळा खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. योगगुरूंच्या मते, दिवसातून फक्त एकदाच खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. जे जास्त शारीरिक श्रम करतात ते दिवसातून दोनदा जेवू शकतात. दिवसातून 3 वेळा जेवणाऱ्या लोकांना आजार होण्याचा धोका असतो आणि दिवसातून 4 वेळा जेवणे खूप धोकादायक असते असेही त्यांनी येथे नमूद केले आहे

 

कसे असते जेवण?

सात्विक जेवणाचा करा समावेश

दुपारी 11-12 वाजता जेवणाचा आस्वाद रामदेव बाबा घेतात. यानंतर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फक्त फळे खातात. 99 टक्के अन्नामध्ये कोणतेही धान्य नसते. या आहारात फळे आणि भाज्या भरपूर असतात, ज्यामध्ये दुधी भोपळा, झुकिनी आणि मिश्र भाज्यांचा समावेश असतो. त्यांना बटाटे खायला आवडत नाहीत आणि त्यांनी 20 वर्षांपासून धान्यही खाल्ले नाही असेही सांगितले. मात्र आता काही दिवस ते बाजरी खातात आणि काही दिवसांनी पुन्हा बाजरी खाणे सोडून देत असल्याचेही सांगितले.

 

खाण्याची योग्य पद्धत कोणती?

बाबा रामदेव यांनी सांगितले की, दिवसातून सर्वात आधी फळे आणि सॅलडसारखे कच्चे अन्न खाल्ले पाहिजे. यानंतर, हिरव्या भाज्या, भाज्या, धान्ये आणि शेवटी काही गोड पदार्थ खा. पण मिठाईमध्ये साखर असू नये. यासाठी तुम्ही गोड फळे, सुकामेवा, गूळ, साखर, अंजीर इत्यादी खाऊ शकता. हे खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य ठरते आणि तुम्ही दीर्घकाळ आजारी न पडता निरोगी राहता.

2 पदार्थ ठरतात घातक

कोणते पदार्थ खाणे टाळावे

रामदेव यांच्या मते, भात आणि गहू खाणे घातक ठरू शकते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे खूप शक्तिशाली योग आहेत, प्रत्येकाने त्यांचा सराव केला पाहिजे. तसंच रात्री त्यांनी गोड पदार्थ, चहा, कॉफी, दही, ताक आणि चॉकलेट खाण्यास मनाई केली आहे. जर एखाद्याला झोपेची समस्या असेल तर त्यांनी कांदा खावा या उपायाने गाढ झोप येऊ शकते असा सल्ला त्यांनी दिला.

हेल्दी पदार्थ कोणते?

कोणत्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे

अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब, गाजर, बीट, गव्हाचे गवत आणि कोरफड खावे. मुळा पोट आणि यकृतासाठी चांगला असतो. हे पोटातील निरोगी बॅक्टेरिया वाढवते. सीताफळ खाल्ल्याने कधीही अ‍ॅसिडिटी होणार नाही आणि ते कॅल्शियमने समृद्ध आहे असा सल्लाही यावेळी रामदेव बाबांनी मुलाखतीमध्ये दिला आहे.

 

You Might Also Like

जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली ! धक्कादायक प्रकार काय ?

एखाद्या देशाने अणुबॉम्ब टाकला तर रेडिएशनपासून कसे वाचावे? जाणून घ्या …

महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक घडलं काय ?

‘तो’ फोन आला अन् डोक्यात गोळी झाडली,आत्महत्येचा प्रयत्न का केला?

admin January 13, 2025 January 13, 2025
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
स्टर मनी विश्लेषण

नवीन लग्न झालेल्या तरुणी गुगलवर ‘या’ विचित्र गोष्टी सर्च करतायत;अनेकवेळा तिला हे प्रश्न कोणालाच विचारता येत नाही.

admin admin December 16, 2024
दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज,बाहेर उभी आहे, आत तर घ्या,नवरा कोमात; असं कसं घडलं?
“…तर जमीन परत द्यावी लागणार”; वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीशीवर AIMIM आमदाराचे विधान
महाराष्ट्रात ढगफुटी ! हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; बीड, शिर्डी, रायगड, कोल्हापुर, पुणे आणि… धो धो पाऊस
बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?