By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Star MoneyStar MoneyStar Money
Notification Show More
Font ResizerAa
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Reading: मृत्यूच्या वेळी व्यक्तीला ‘असं’ काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..
Share
Font ResizerAa
Star MoneyStar Money
Search
  • मुख्यपृष्ठ
  • लेटेस्ट न्यूज
  • म्युच्युअल फंड
  • डिमॅट खाते
  • बँक
  • यशस्वी उद्योजक
  • टेक-गॅजेट
  • इतर
    • कर
    • कर्ज
    • क्रिप्टो
  • लाईफस्टाईल
  • शेअर मार्केट
  • स्कॉलरशिप
Have an existing account? Sign In
Follow US
Star Money > Blog > धार्मिक > मृत्यूच्या वेळी व्यक्तीला ‘असं’ काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..
धार्मिक

मृत्यूच्या वेळी व्यक्तीला ‘असं’ काय दिसतं? शेवटच्या क्षणी आवाज का बंद होतो? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या..

admin
Last updated: 2024/12/16 at 10:11 AM
admin Published December 16, 2024
Share
SHARE

मृत्यू म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. अंगावर काटा उभा राहतो. लोकांना मृत्यूबद्दल खूप भीती वाटते. पण भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जो या पृथ्वीवर जन्म घेईल, त्याला मृत्यूही अटळ आहे.

पण तुम्हाला माहितीय का मृत्यूच्या वेळी व्यक्तीला खूप वेदना होतात? मृत्यूच्या वेळी अनेक लोकांचा आवाज बंद होतो आणि माणूस रडायला लागतो. गीता, गरुड पुराण कथोपनिषद यांसारख्या आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. व्यक्तीला शेवटच्या क्षणी असं काय दिसतं? गरुड पुराणातून सत्य जाणून घ्या…

 

मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कसे वाटते?

एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार, ज्योतिषी पंकज पाठक यांनी सांगितले की, जीवन आणि मृत्यू एकमेकांना पूरक आहेत. गीतेतही श्रीकृष्णाने सांगितले आहे की, जो जन्म घेतो त्याचा अंत होणारच. मृत्यू अत्यंत क्लेशदायक मानला जातो. म्हणूनच लोक मृत्यूला घाबरतात, तर धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यू ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे वर्णन केले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मृत्यू ही शरीर बदलण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर वृद्ध होते तेव्हा आत्मा मृत्यूद्वारे त्याचे शरीर बदलतो. मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कसे वाटते, व्यक्ती का रडते आणि त्याचा आवाज का थांबतो हे जाणून घ्या.

 

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण जवळ येतो, तेव्हा..

गरुड पुराणानुसार, पापी व्यक्तीचा श्वास शरीराच्या खालच्या मार्गाने बाहेर पडतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण जवळ येतो, तेव्हा यमराजाचे दोन दूत त्याच्याकडे येतात. गरुड पुराणात असे सांगितले आहे की, यमदूत दिसायला खूप भितीदायक असतात आणि डोळे मोठे असतात. यमराजाच्या अशा दूतांना पाहून पापी प्राणी घाबरतात आणि लघवी करू लागतात. मृत्यूच्या वेळी यमराजाचे दूत त्या व्यक्तीकडे येतात आणि त्याचा जीव घेतात. त्यावेळी त्या व्यक्तीला 100 विंचूच्या नांगीएवढे वेदना जाणवते. यासोबतच त्या व्यक्तीचे तोंड आतून कोरडे पडू लागते आणि लाळ गळू लागते.

 

यमराजाचे दूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात.

गरुड पुराणानुसार, माणसाच्या मृत्यूच्या वेळी अंगठ्याच्या आकाराचा प्राणी ओरडत शरीरातून बाहेर पडतो. ज्याला यमराजाचे दूत पकडतात. यमराजाचे दूत त्या आत्म्याला पकडून यमलोकाच्या प्रवासाला घेऊन जातात. दूत त्याला बांधून सोबत घेऊन जातात. मृत्यूनंतर नरकाच्या प्रवासाला जाताना माणूस थकतो, तेव्हा यमराजाचे दूत त्याला घाबरवतात आणि त्या पापी प्राण्याला नरकातील दुःख सांगतात. यावेळी व्यक्ती आपल्या सर्व पापांची आठवण करून चालते. ज्याचा विचार करून त्याचे हृदय थरथर कापायला लागते.

 

व्यक्तीला सर्व काही आठवते

गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये दिव्य दृष्टी निर्माण होते. त्यावेळी त्या व्यक्तीला जग व्यापक दिसू लागते आणि त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील घटना आठवतात. क्षणार्धात एखाद्याचे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर येते. यानंतर तो त्याच्या नव्या आयुष्याचा प्रवास सुरू करतो.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. स्टार मनी यातून कोणताही दावा करत नाही. )

You Might Also Like

महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले

चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घातलेल्यांनाच प्रवेश

महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी; सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द, मोदींचा योगींना फोन

‘या’ २ गोष्टींचा करा त्याग; यश तुमच्या मागे येईल धावत! भगवान श्रीकृष्ण म्हणतात…

admin December 16, 2024 December 16, 2024
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Find US on Social Medias
Facebook Like
Twitter Follow
Youtube Subscribe
Telegram Follow

Weekly Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form]
Popular News
क्राईम

स्वारगेट बलात्कार पीडितेसोबत ससून रुग्णालयातही असंवेदनशील कृत्य, संतापजनक …

admin admin March 4, 2025
बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडल भयंकर …..
धक्कादायक; दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचा काढला काटा, शीर वेगळं करून फेकलं विहिरीत
‘या’ २ गोष्टींचा करा त्याग; यश तुमच्या मागे येईल धावत! भगवान श्रीकृष्ण म्हणतात…
शेअर बाजारातही चीन ठरतोय भारताला डोकेदुखी ? जाणून घ्या भारतीय शेअर बाजार घसरणीचे नेमके कारण ?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

About US

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet.
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Disclaimer
2024© STARMONEY. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?